Weather Study Guide and Practice Test 2025 | विषय : भूगोल – हवामान यावर अभ्यासत्मक माहिती व सराव टेस्ट

काळ्या मुंग्या जेव्हा आपल्या इवल्याशा तोंडात पांढरी पांढरी इवलीशी अंडी धरुन त्यांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करताना दिसतात, तेव्हा लवकरच पाऊस पडणार असा अंदाज आपण बांधतो, कारण पावसाची चाहूल अगोदर या मुंग्याना लागते. म्हणून आपली पुढची पिढी सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी या मुंग्यांचीही धडपड सुरु असते. या व अशा अनेक निसर्गातील घडामोडींद्वारे आपण हवामानासंदर्भात आपले अंदाज बांधत असतो. Weather Study Guide and Practice Test

परंतू शास्त्रीय पद्धतीने हवामानविषयीचा अभ्यास व पूर्वानुमान करण्याकरीता भारतात १८७५ साली भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली. या हवामान शास्त्र विभागाचे पहिले महासंचालक हे हेन्री ब्लॅनफोर्ड हे होते. यांनीच सर्वात पहिले म्हणजेच ४ जून १८८६ रोजी नैऋत्य मान्सूनच्या पर्जन्यमानाचे पूर्वानुमान भारतीय हवामान शास्त्र (आयएमडी) विभागाद्वारे प्रस्तुत केले. पुढील काळात हवामान खात्याद्वारे प्रगत पद्धतींच्या आधारावर हवामानाविषयी पूर्वअंदाज सादर केले गेले. यात डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी मान्सूनचे पूर्व अंदाज देण्यासाठी तयार केलेले १६ पॅरामीटर मॉडेल अतिशय महत्त्वाचे मानले जाते. आज आपण हवामानाचा पूर्व अंदाज घेण्यासाठी रडार यंत्रणा याचबरोबर उपग्रहांचादेखील वापर करीत आहोत. मेटसेंट हा उपग्रह भारताने प्राधान्याने हवामानविषयक माहिती घेण्याकरीता अवकाशात सोडलेला आहे.

या प्रकरणामध्ये आपण हवामान म्हणजे काय, हवामानाचे घटक, वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे हवामान, हवामानाचे विश्लेषण या सारख्या सर्वच बाबींचा अभ्यास करणार आहोत.

महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात येत असला, तरी महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी सारखेच तापमान, पर्जन्य वितरण हवेची सिथती आदळून येत नाही. महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना पश्चिमेला असणारा अरबी समुद्र, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार राज्यातील नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्याांचे अस्तित्व व पूर्वेकडील पसरलेला पठारी प्रदेश यासारख्या घटकांचा प्रभाव महाराष्ट्राच्या

१) महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान : महाराष्ट्राचे स्थान भारतीय दीपकल्पाच्या पश्चिम भागात असून महाराष्ट्राचा पूर्वेकडील विस्तार है हवामानावर द्वीपकल्पाच्या मध्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील हवामानापेक्षा पूर्वेकडील हवामानात वेगळेपणा आढळून येतो.

२) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार : महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा १५०४४” ते २२०६” उत्तर अक्षवृत्त असा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा समावेश हा उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात होतो व उष्णकटिबंधीय हवामानाची सर्व वैशिष्ट्ये महाराष्ट्रातील हवामानात आढळून येतात.

३) पश्चिमेस असणारा अरबी समुद्र : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला ७२० कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिमेकडील (कोकण) भागात हवेत आर्द्रता अधिक असते तुलनेने पूर्वेकडील हवामान हे कोरडे असते.

४) मोसमी वारे : महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानामुळे महाराष्ट्राला मिळणारा ८५ टक्के पाऊस हा नैऋत्य मोसमी वात्र्यांपासून मिळतो, तर महाराष्ट्राच्या पूर्व भागात ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासूनदेखील पाऊस मिळतो.

५) महाराष्ट्राची प्राकृतिक रचना : महाराष्ट्रातील हवामानावर महाराष्ट्रातील प्राकृतिक रचनेचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्री पर्वतामुळे समुद्र किनारपट्टीवरील हवामान पठारावर येण्यास निर्बंध येतो, तर सह्याद्रीमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक पाऊस तर सह्याद्रीच्या पूर्वेकडे कमी पाऊस अशी स्थिती निर्माण होते. त्याचबरोबर सह्याद्रीच्या उंचीवरच्या भागात काही थंड हवेची ठिकाणेदेखील विकसित झालेली आहेत. Weather Study Guide and Practice Test


Weather Study Guide and Practice Test

२१ मार्चनंतर सूर्याची किरणे उत्तर गोलार्धात लंबरूप पडण्यास सुरवात होते. त्यामुळे महाराष्ट्रातही या दिवसापासून उन्हाळ्यास सुरवात होते. साधारणतः मे महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदविले जाते. उब तापमान व कोरडी हवा हे उन्हाळी हवामानाचे वैशिष्ट् असते.

तापमान व तापमान कक्षा : Weather Study Guide and Practice Test

कोकण किनारपट्टी : कोकण किनारपट्टीच्या भागात दैनिक कमाल तापमान ३३°C पर्यंत नोंदविले गेले आहे. या भागात मार्चमध्ये सर्वाधिक तापमान नोंदविले जाते. मे मध्ये या भागातून नैऋत्य मोसमी वारे वाहण्यास सुरवात होत असल्याने येथे या कालावधीत तापमानात घट दिसून येते. कोकण किनारपट्टीच्या भागात दैनिक तापमान कक्षा ६ च्या जवळपास आढळून येते. म्हणजेच तेथील हवामान सम आहे.

पश्चिम पठार : पश्चिम पठारावरील भागात उन्हाळ्यात ३५०० ते ४००८ पर्यंत तापमान वाढते. पश्चिम पठारावरील तापमान कक्षादेखील कोकण किनारपट्टीपेक्षा वाढलेली आढळून येते. या ठिकाणी तापमान कक्षा या दिवसात १२०८ ते १५०८ असते.

पूर्व पठार : पूर्व पठारावर अधिकतम तापमान ४००८ ते ४५०८ पर्यंत तापमान नोंदविले गेले आहे. तर या भागातील तापमान कक्षा या दिवसांत २० पर्यंत असते.

विदर्भातील पठारी प्रदेश व मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील पट्टा या भागात तापमान अपवादात्मक स्थितीत वाढलेले आढळते.

वायूभार व वारे : महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वच ठिकाणी उच्च तापमान असते. पठारी प्रदेशातील उच्च तापमानामुळे येथील वायूभार हा १००८ मि.ली. बारपर्यंत कमी होतो, तर किनारपट्टीवरील भागात १०१० पर्यंत वाढतो. त्यामुळे वायूभाराचा उतार तीव्र होऊन समुद्रावरून जमिनीकडे वेगाने वारे वाहू लागतात.

सापेक्ष आर्द्रता : उन्हाळ्यात तापमान उच्च असते व हवा कोरडी असते. त्यामुळे पठारी भागात हवामानात आर्द्रता कमी आढळते. त्यातही पूर्व विदर्भात तर आर्द्रता २० टक्क्यांपेक्षाही कमी असते, तर कोकण किनारपट्टीच्या भागाकडे असणाऱ्या अरबी समुद्राकडे या भागातील हवेची आर्द्रता मेमध्ये ६८ टक्क्यांपर्यंत नोंदविली गेली आहे.

पर्जन्य : उन्हाळा हा कोरडा ऋतू असल्याने या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस पडत नाही. परंतु महाराष्ट्राच्या काही भागांत उन्हाळ्यात पाऊस नोंदविला गेला आहे. दक्षिण महाराष्ट्रात पडणाऱ्या उन्हाळी पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात, तर कोकण किनारपट्टीव समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आंबेसरी पडतात. याचबरोबर मध्य दक्षिण महाराष्ट्र व पश्चिम किनारपट्टीवर उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मॉन्सून सरी पडतात. Weather Study Guide and Practice Test

२३ सप्टेंबरनंतर सूर्यकिरणे दक्षिण गोलार्धात लंबरूप पडण्यास सुरवात होते. त्यामुळे सूर्याची किरणे उत्तर गोलार्धात तिरपी पडायला लागता व त्याचा परिणामस्वरुप उत्तर गोलार्धात दिवसाचा कालावधी कमी होत जातो व उष्णतामानही कमी होत जाते. Weather Study Guide and Practice Test महाराष्ट्रातील हिवाळ्ळ साधारणतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत असतो. या कालावधीत महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी तापमान कमी, हवा थंड व कोरड असते. राज्यात सर्वांत कमी तापमान कोकण किनारपट्टी व पूर्वपठारावर जानेवारीत, तर मध्य व पश्चिम पठारावर डिसेंबरमध्ये नोंदविले जाते.

तापमान व तापमान कक्षा :-

कोकण किनारपट्टी :- पश्चिमेला असणाऱ्या अरबी समुद्रामुळे या भागातील हवामान सम असते. सागरसान्निध्यामुळे हवा ऊबदार राहते. या भागात हिवाळ्यात किमान तापमान २० च्या वरच नोंदविले जाते, तर तापमान कक्षा १० च्या जवळपास असते.

पश्चिम पठारी प्रदेश :- पश्चिम पठारी प्रदेशात तापमान १५ पेक्षाही कमी नोंदविले जाते. अपवादात्मक स्थितीत ते ५ डिग्रीच्या जवळपासही जाते. तर या भागातील तापमान कक्षा या दिवसांत १५ ते २० च्या दरम्यान असते.

पूर्व पठारी प्रदेश :- पूर्व पठारी प्रदेशावर किमान तापमान १५ डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी असते. तेथील हवामान विषम असल्याने या दिवसांत तेथील तापमान कक्षा वाढलेली आढळून येते.

वायूभार व वारे :- हिवाळ्यात वायूभार हा पूर्व विदर्भात अधिक होऊन १०२० मि.ली. बारपर्यंत पोहोचतो, तर नैऋत्य महाराष्ट्रात वायूभार कमी होत जाऊन कोकण किनारपट्टीपर्यंत तो १०१४ मि.ली. बार इतका खाली येतो. वायूभाराचा उतार मंद असल्याने या भागात या कालावधीत मंद वारे वाहताना आढळतात.

सापेक्ष आर्द्रता :- हिवाळ्यात पावसाचे प्रमाण नगण्य असल्याने या ऋतूत हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी होते. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या भागात डिसेंबरमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता ही सर्वांत जास्त म्हणजे ६४ टक्के मुंबई येथे नोंदविली गेली आहे, तर पठारी प्रदेशावर पूर्व पठारावर सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण ४४ टक्क्यांपर्यंत खाली येते. Weather Study Guide and Practice Test

पर्जन्य :- महाराष्ट्रात हिवाळ्यात आकाश निरभ्र व स्वच्छ असते. परंतु पूर्व पठारावरच्या काही भागात ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो.

राज्यात पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर आहे. राज्याला ८५% पाऊस मे ते सप्टेंबर या कालावधीत वाहणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून, तर उर्वरित १५% पाऊस ऑक्टोबर-जानेवारी या कालावधीत वाहणाऱ्या ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. Weather Study Guide and Practice Test राज्यात पावसाचे प्रमाण ६० सें. मी. ते ६०० सें. मी. दरम्यान आहे. राज्यात सर्वात जास्त पाऊस जुलैमध्ये पडतो.

राज्यात पावसाचे विभाजन प्राकृतिक विभागानुसार खालीलप्रमाणे झालेले आहे.

कोकण किनारपट्टी – ३०० सें.मी.

सह्याद्री/पश्चिम घाट सें.मी. ६००

पश्चिम पठार – ७०-८० सें.मी.

पूर्व पठार – १५०-२०० सें.मी.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला दक्षिण भागात सर्वप्रथम पावसाचे आगमन होते व संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होतो. या भागात सर्व प्रकारचा पाऊस होतो. पुढे नैऋत्य मोसमी वारे सह्याद्री पर्वतावर येऊन धडकतात या ठिकाणी मोसमी वारी अडवूनपाऊस पाडला जातो म्हणून या भागात पडणाऱ्या पावसास प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणतात. सह्याद्री पर्वतात सर्वात जास्त पाऊस पडतो. या पर्वतातील अंबोली या ठिकाणी आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस ७४७ सें.मी. इतका नोंदविण्यात आलेला आहे. नैऋत्य मोसमी वारे सह्याद्री पर्वत ओलांडून पश्चिम पठाराकडे जातात. नैऋत्य वाऱ्यांमधील बाष्प सह्याद्री पर्वतात पडून गेल्याने पश्चिम घाट ओलांडल्यानंतर त्यांच्यात बाष्पाचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्व उताराच्या लागून असलेल्या प्रदेशात अचानक पावसाचे प्रमाण कमी होते व या भागात अत्यंत कमी पाऊस पडतो. या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात. नैऋत्य मोसमी वारे हळूहळू पुढे सरकतात. त्याच्यातील बाष्पाचे प्रमाण वाढत जाते व त्यानुसार पुढे पूर्व विदर्भापर्यंत पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होत जाते. Weather Study Guide and Practice Test

Weather Study Guide and Practice Test

सह्याद्री पर्वतातील व सातपुडा पर्वतातील उंचीवरील सर्वच ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण वातावरण आढळून येते. येथील थंड हवेच्या ठिकाणी तापमान वर्षभर कमी असते. त्यामुळे वातावरणात गारवा असतो. त्याचबरोबर येथील हवेत आर्द्रता मोठ्या प्रमाणावर असते. Weather Study Guide and Practice Test येथील हवामानाचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यातही येथील पारा ३० डिग्रीच्या वर चढत नाही. पावसाळ्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील आंबोली, महाबळेश्वर, माथेरान यासारख्या ठिकाणी जास्त दिवस व भरपूर पाऊस पडतो. थंड हवेच्या ठिकाणचे किमान तापमान हे १०० पेक्षाही कमी होऊन जाते. या दिवसांत या भागातील कमी उंचीवरील ठिकाणी सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर धुके पसरलेले असते.

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, पावसाचे प्रमाण, हवामान, मृदा व त्या मृदेत घेण्यात येणाऱ्या पिकांचे स्वरूप यावरून महाराष्ट्राच्या कृषी खात्याने महाराष्ट्राची विभागणी ९ कृषी हवामान विभागांत केली आहे. भारताच्या कृषी विभागाने भारताची विभागणी एकूण १५ कृषी हवामान विभागात केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात भारतीय कृषी हवामान विभाग क्रमांक ७,९ व १२ असे तीन विभाग येतात. Weather Study Guide and Practice Test

१) दक्षिण कोकण किनार विभाग (जांभ्या मृदेचा भाग)

  • सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा भाग या विभागात येतो.
  • पावसाचे प्रमाण १०५ दिवसांत ३१०० मि. मी.
  • प्रमुख पिके तांदूळ, वरी, नागली ही घेतली जातात.

२) उत्तर कोकण किनार विभाग (तांबूस तपकिरी मृदेचा भाग)

  • ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश.
  • पावसाचे प्रमाण ८७ दिवसांत २६०७ मि. मी.
  • प्रमुख पिके तांदूळ, नागली ही घेतली जातात.

३) पश्चिम घाट प्रदेश

  • सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील प्रदेश
  • सर्वाधिक पावसाचा चिंचोळा पट्टा, पावसाचे प्रमाण ३००० ते ६००० मि. मी.
  • प्रमुख पिके वरी, नाचणी ही घेतली जातात.

४) उपपर्वतीय विभाग (संक्रमण विभाग-१) (तांबड्या मृदेचा भाग)

  • सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग.
  • पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचे पश्चिमेकडील तालुके.
  • पावसाचे प्रमाण ७०० ते २५०० मि. मी.
  • प्रमुख पिके तांदूळ, वरी, रगी ही घेतली जातात.

५) पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश (संक्रमण विभाग-२) (मध्यम काळी व गडद काळी)

  • नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूरचा मध्य भाग ( पर्जन्यछायेच्या प्रदेश )
  • पावसाचे प्रमाण ७०० ते १२५० मि. मी.
  • प्रमुख पिके ज्वारी, बाजरी ही घेतली जातात

६) पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश (अवर्षणप्रवण विभाग) (काळी कसदार मृदेचा भाग)

  • जळगाव, धुळे, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांतील काही तालुके
  • पावसाचे प्रमाण ४५ दिवसांत ७५० मि. मी. पेक्षा कमी.
  • प्रमुख पिके ज्वारी, बाजरी ही घेतली जातात.

७) मध्य महाराष्ट्र पठारी विभाग (निश्चित पावसाचा प्रदेश) (करडी काळी मृदेचा भाग)

  • मराठवाडा व पश्चिम विदर्भ,
  • पावसाचे प्रमाण ७०० ते ९०० मि. मी.
  • प्रमुख पिके ज्वारी, बाजरी, काही प्रमाणात गहू ही घेतली जातात.

८) मध्य विदर्भ (मध्यम पावसाचा प्रदेश) (तपकिरी काळी मृदेचा भाग) Weather Study Guide and Practice Test

  • नागपूर, वर्धा, यवतमाळ
  • पावसाचे प्रमाण ९०० ते १२५० मि. मी.
  • प्रमुख पिके तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, तीळ, जवस ही घेतली जातात.

९) पूर्व विदर्भ (तपकिरी व तांबड्या मृदेचा भाग)

  • भंडारा, गोंदिया, गडचिरोली
  • पावसाचे प्रमाण ५९ दिवसांत १२५० ते १७०० मि. मी.
  • प्रमुख पीक तांदूळ घेतले जाते.

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र