महात्मा फुले :
एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली. या मुक्ती संग्रामाचे मूळ स्त्रोत ज्योतिरावांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महात्मा फुलेंचा गौरव करताना म्हणतात, हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले.
- जन्म : ११ एप्रिल १८२७, पुणे.
- मूळ गाव : कटगुण (जि. सातारा)
- मुळ आडनाव : गोऱ्हे
- जोतिबा क्षत्रिय माळी समाजातील होते.
- जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोऱ्हे आडनाव मागे पडून ते फुले बनले.
- जोतिबांचे आजोबा : शेटिबा ; पिता : गोविंदराव, माता : चिमणाबाई (जोतिबा १ वर्षाचे असताना मातोश्रींचे निधन)
- १८३४ ते १८३८ : पंतोजींच्या शाळेत जोतिबांचे प्राथमिक शिक्षण.
- १८४० : वयाच्या १३ व्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी विवाह.
- १८४१ ते १८४७ : उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत जोतिबांचे इंग्रजी शिक्षण.
- १८४८ : पुण्यात ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत अपमान झाल्याने जोतिबा सामाजिक सुधारणांकडे वळले.
महात्मा फुले यांचे महिला उद्धाराचे कार्य :
अ) स्त्री शिक्षण : जोतिबांनी समाजकार्यास सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले.
- १८४८ : पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू
- ३ जुलै १८५१ : बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू.
- १७ सप्टेंबर १८५१ : रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू
- १५ मार्च १८५२ : वेताळ पेठेत मुलींची शाळा सुरू.
- मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या जोतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती.
- स्त्रीशिक्षणाविषयी महत्त्व सांगताना ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ असे फुले म्हणत.
- १६ नोव्हेंबर १८५२ : जोतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.
ब) विधवा पुनर्विवाह :
- १८६४: पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
- १८६५ : विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव ढमढेरे येथे नाभिक बांधवांचा संप घडवून आणला.
क) बाल हत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना, १८६३ :
- चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी जोतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.
- जोतिबांना अपत्य नव्हते. काशिबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले.
महात्मा फुले यांचे अस्पृश्यतानिर्मूलन कार्य :
- १९ व्या शतकात भारतात अस्पृश्यता निर्मुलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम केली
- महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी संपूर्ण समाज व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे हा विचार सर्वप्रथम मांडला.
- १८५१ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू होणे आवश्यक आ
- १८५२ अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली.
- १८५३ : पुण्यात ‘महार, मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकविणारी मंडळी’ ही संस्था स्थापन केली.
- १८५८ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू.
- महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राइझ फंडातून आर्थिक सहाय्य मिळाले.
- १८६८ : स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
- १८७३ : महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
- १८७७ : मध्ये ‘दीनबंधू’ या वृत्तपत्रातून सामाजिक रुढी-परंपरा तसेच अस्पृश्यांच्या परिवर्तनाचे विचार मांडले.
सत्यशोधक समाजाची स्थापना : २४ सप्टेंबर १८७३.
- शुद्रातिशुद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने महात्मा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- ‘सार्वजनिक सत्यधर्म’ व ‘गुलामगिरी’ या ग्रंथांत जोतिबांनी सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांबद्दल विवेचन केले आहे.
- सत्यशोधक समाजाचे ब्रीद : वाक्य सर्वसाक्षी जगत्पती। त्यासी नकोच मध्यस्थी ।।
- सत्यशोधक समाज ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे.
- डिसेंबर १८७३ : मध्ये सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला.
- सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष :नारायण मेघाजी लोखंडे
- सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक : नारायणराव कडलक
- सत्यशोधक समाजाची अधिवेशनेः १८७३ साली स्थापना झाली तरी सत्यशोधक समाजाची अधिवेशने १९११ पासून सुरू झाली.
- पहिले अधिवेशन : १७ एप्रिल १९११, पुणे. • अध्यक्ष : स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू.
- स्वागताध्यक्ष : गणपतराव बिरमल.
महात्मा फुलेंचे शेतकऱ्यांसाठी कार्य :
- शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याविषयी जोतिबांनी सरकारला पुढील सूचना केल्या होत्या.
- १) तलाव, बंधारे, धरणे बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा.
- २) पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत.
- ३) कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे.
- ४) पशुपालनासाठी चालना द्यावी.
- ५) सुधारित शेतीसाठी सुधारित अवजारे, अल्पव्याजी कर्जे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी.
- १८७७ च्या दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळ पीडीत विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली.
- १८८८ मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले असता जोतिरावांनी पारंपरिक शेतकऱ्याच्या वेषात त्यांची पुणे येथे भेट घेऊन भारतीय शेतकऱ्यांच्या हालाखीचे दर्शन घडविले.
- जुन्नर (पुणे) येथील शेतकऱ्यांचा सावकारशाहीविरुद्धचा लढा जोतिबांनी यशस्वी केला.
- १८७६-७७ च्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत जोतिबांच्या सहकायनि शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड यशस्वी केले.
- शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते ते खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.
- विद्येविना मती गेली। मतीविना नीति गेली।
- नीतिविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
- वित्ताविना शुद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जोतिबा हे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक होते.
महात्मा फुलेंचे शिक्षणविषयक विचार :
- १८८२ साली भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते.
- जोतिबा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना पुढील विचार मांडले-
- १) सरकार शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करते, त्यातील उत्पन्न कनिष्ठांच्या (शेतकरी वर्गाच्या) शिक्षणावर खर्च केले पाहिजे,
- २) १२ वर्षांखालील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे.
- ३) प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत.
महात्मा फुलेंचे धर्मविषयक विचार :
जोतिबा कट्टर एकेश्वरवादी होते व ईश्वराचे अस्तित्व मानणारे होते.
- जोतिबांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले आहे.
- समतेवर आधारलेल्या मानवधर्माचा जोतिबांनी पुरस्कार केला.
- अस्पृश्यांची कैफियत, खतफोडीचे बंड, सत्यशोधक समाज हे ग्रंथदेखील जोतिबांनी लिहिले.
- अभंगांच्या धर्तीवर त्यांनी ‘अखंड’ रचले. (अखंडादी काव्यरचना)
- जोतिबांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा शेवटचा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ मानला जातो.
- पक्षाघातामुळे अंग लुळे पडल्याने जोतिबांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ काही काळ डाव्या हाताने लिहिला.
- ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार या ग्रंथांमधून जोतिबांनी बहुजन समाजावर लादली गेलेली मानसिक गुलामगिरी निदर्शनास आणली.
महात्मा फुलेंचे राजकीय विचार :
- इंग्रजांच्या सामाजिक, शैक्षणिक सुधारणाधोरणामुळे जोतिबांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती; मात्र शासन सत्ता समाजाच्या उन्नतीच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या हितसंबंधांच्या आड येईल असे वाटले त्या त्या वेळी त्यांनी सरकारवर टीकादेखील केली.
- १८८९ च्या राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथील अधिवेशनात जोतिबांनी ‘जोपर्यंत शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेतसामावून घेतले जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय म्हणवून घेण्याचा अधिकार सभेस पोहोचत नाही’ असे परखड विचार मांडले.
- आठ वर्षांच्या आतील मुलांना कामावर घेण्यात येऊ नये असे निवेदन जोतिबांनी सरकारला सादर केले.
- महात्मा फुले यांच्यावर प्रभाव : जोतिबांवर थॉमस पेन यांच्या ‘राईटस ऑफ मॅन’ व ‘कॉमन सेन्स’ या ग्रंथांचा विशेष प्रभाव होता. शालेय जीवनात जोतिबांवर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचा प्रभाव पडला.
- जोतिबांचे सहकारी : सदाशिव बल्लाळ गावंडे, सखाराम परांजपे, लोखंडे, केशवराव भवाळकर, वाळवेकर इत्यादी.
- नगरसेवक : १८७६ ते १८८२ या काळात फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते.
- नगरसेवक असताना फुलेंनी पुणे मार्केटची इमारत बांधण्यास व लॉर्ड रिपनला मानपत्र देण्यास विरोध दर्शविला व त्यावरील खर्च शिक्षणासाठी वापरावा, अशी शिफारस केली.
- समाजातील व्यसनाधिनता दूर करण्यासाठी फुल्यांनी पुण्यातील दारूच्या गुत्त्यांना परवाना देण्यास विरोध केला.
- १८७५ : : न्या. रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची हत्तीवरून मिरवणूक काढली, त्यावेळी जोतिबांनी न्या. रानडे यांना सहकार्य केले.
- शिवजयंती सुरुवात : १८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला.
- रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज जोतिबांनी केला होता.
- १८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली ‘शिवजयंती’ साजरी केली.
- त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी १८९५ पासून शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले.
- १८७७ : दीनबंधू हे वृत्तपत्र जोतिबांच्या आशिर्वादाने चालू झाले. संपादक: कृष्णराव भालेकर.
- जोतिबांना जीवे मारण्यासाठी पाठविण्यात आलेले रोडे व कुंभार हे रामोशी बांधव जोतिबांना शरण आले.
- जोतिबांच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सावलीप्रमाणे साथ दिली.
- टिळक व आगरकर यांची डोंगरी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुलेंनी या दोघांचा मुंबई येथे सत्कार केला.
- पंडिता रमाबाई यांना धर्मांतरापासून रोखण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला.
- जोतिबांबद्दलचे गौरवोद्गार : ‘समाजक्रांतिकारक’
- ‘खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार’
- ११ मे १८८८ : मुंबईच्या जनतेच्या वतीने रावबहाद्दर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी जोतिबांना महात्मा ही पदवी दिली.
- डॉ. धनंजय किर फुलेंविषयी म्हणतात, “जोतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी तणे, बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली.”
- महात्मा गांधी फुलेंविषयी म्हणतात, ‘जोतिबा हे खरे महात्मा होते.’
- ग्रामची या तत्त्ववेत्याने जोतिबांना ‘सेंद्रीय बुद्धीवंत’ असे संबोधले.
- बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदूस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन असे संबोधले आहे.
- डॉ. धनंजय किर यांनी जोतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे संबोधले आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘हू वेअर द शुद्राज?’ (शुद्र कोण होते?) हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
- जोतिबा फुलेंचे निधन : २८ नोव्हेंबर १८९०. जोतिबांनी मृत्यूपत्रात आपले दहन न करता परसदारी मिठात घालून पुरण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.
- जोतिबा हे उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता साधणारे सुधारक होते.
- स्त्री-पुरुष समानता, जातीभेदास विरोध, स्वातंत्र्य, समता व बंधूता यांचे महत्त्व पटवून मानवाचे स्वत्व जागविणारे जोतिबा हे भारतीय समाजक्रांतीचे जनक होते.

सावित्रीबाई फुले :
- जन्म : 3 जानेवारी 1831, नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे.
- महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले त्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच पहिल्या मुख्याध्यापिका होत. ‘
- काव्यफुले’, ‘बावन्नकशी’, ‘सुबोध रत्नाकर’ या काव्यसंग्रहातून सावित्रीबाईंनी समाज प्रबोधनाचे विचार मांडले.
- महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे सांभाळली, विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी संस्था स्थापन केली. हळदी-कुंकू, चहापान असे कार्यक्रम घेऊन स्त्रियांना एकत्रित केले.
- निधन : १० मार्च १८९७ रोजी प्लेगच्या रुग्णांची सुश्रुषा करताना प्लेगची बाधा होऊन या क्रांतिज्योतीचे निधन.
- सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या स्त्री-शुद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविला.
- महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचा गौरव केला जातो.
- ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात ‘स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून साजरा केला जातो.

सत्यशोधक
सत्यशोधक फुले
1973
1873 ahe te bhava zopet nko rahu mazya lahan bhava proof de photo tak whatapp la 9960318787 la