महाराष्ट्राचा इतिहास :
- इंग्रज-मराठे संघर्ष : १७७४ ते १८१८ दरम्यान मराठे-इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली.
- पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२) : वॉरन हेस्टिंग्जच्या काळात सुरू झालेले हे युद्ध मराठ्यांनी जिंकले.
- १७ मे १७८२ रोजी महादजी शिंदेंनी इस्ट इंडिया कंपनीशी सालबाईचा तह करून हे युद्ध संपविले.
- ३१ डिसेंबर १८०२ च्या वसईच्या तहामुळे मराठ्यांच्या साम्राज्यास (पेशवाईस) अखेरची घरघर लागली.
- दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५) हे युद्ध इंग्रजांनी जिंकले.
- तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (खडकीची लढाई): ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकी येथे मराठ्यांचा पराभव.
- तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठे पराभूत झाल्याने १८१८ मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला व महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता स्थापित झाली.
- इंग्रजी सत्तेविरोधात महाराष्ट्रातदेखील लहानमोठे उठाव होत राहिले. त्या उठावांची माहिती येथे घेणे अपरिहार्य ठरते.
१८५७ चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्र :
- १८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यात झाला होता.
- महाराष्ट्रातील संस्थानिकांनी रामोशी, कोळी, भिल्ल यांना उठाव करण्यास प्रोत्साहन दिले होते.

महाराष्ट्रातील 1857 च्या उठाव :
- १८५७ च्या उठावाचे लोण प्रामुख्याने उत्तर भारतातच सर्वाधिक पसरले. दक्षिण भारत उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. महाराष्ट्रातील ज्या काही ठिकाणी १८५७ च्या उठावाचे पडसाद उमटले त्याचा थोडक्यात आढावा-
- कोल्हापुरातील उठाव : ३१ जुलै १८५७ रोजी सैन्याच्या २७ व्या रेजिमेन्टमधील भारतीय सैनिकांनी उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी लुटली. २१ व्या व २८ व्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत केली.
- ‘जेकब’ या ब्रिटिश अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला.
- ६ डिसेंबर १८५७ रोजी कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील भारतीय सैनिकांनी उठावाचा प्रयत्न केला. मात्र तो वेळीच दडपून टाकण्यात आला. १५ डिसेंबर १८५७ रोजी कोल्हापूरात चिमासाहेब यांनी बंडाचा प्रयत्न केला.
- साताऱ्यातील उठाव : पेशवाईच्या अस्तानंतर देखील छत्रपती प्रतापसिंह सातारच्या गादीवर होते. इंग्रजांनी त्यांच्याशी तह करून ग्रँट डफ या अधिकाऱ्यास छत्रपतींच्या मदतीसाठी ठेवले.
- कालांतराने छत्रपती प्रतापसिंह यांना काशी येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथे १८४७ साली त्यांचे निधन झाले.
- नाशिकच्या पेठमधील उठाव : नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील राजा भगवंतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी उठाव केला. ६ डिसेंबर १८५७ रोजी हर्मूलच्या बाजारात भिल्लांच्या मदतीने उठाव झाला.
- ‘ग्लासपुल’ या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे बंड मोडून काढताना पेठच्या राजास फाशी दिली. जानेवारी १८५७ मध्ये नांदगाव येथे भिल्लांनी केलेला उठावाचा प्रयत्न मोडून काढला गेला.
- अहमदनगरमधील उठाव : संगमनेरजवळ भागोजी नाईक यांनी उठाव केला.
- खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजाने उठाव केला. यामध्ये ४०० भिल्ल खिया सहभागी सातपुड्यात शंकरशहांनी उठावाचे नेतृत्व केले.
- नागपूरमधील उठाव : नागपूरच्या उठाववाल्यांना लखनौ, कानपूर येथील बंडखोरांची साथ होती. १३ जून १८५७ रोजी सीताबर्डी, कामठी याठिकाणी उठावाचा आखलेला बेत इंग्रजांनी आधीच मोडून काढला.
- यावेळी नागपूरची राणी बांकाबाई इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली.
- औरंगाबादमधील उठाव : येथील घोडदळातील मुस्लीम समाजातील शिपायांच्या उठावाचा प्रयत्न ब्रिटिशांनी मोडून काढला. जमखिंडी संस्थानचे राजे आप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील असल्यामुळे तेथील उठाव फसला.
- मुधोळमधील हुलगडी येथील बेरड समाजाने केलेला उठावाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
- महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे उठाव : लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत लागू केल्यामुळे जमीन महसूलाची जबाबदारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे गेली. शेतसारा भरण्यासाठी अनेकांना जमिनी विकाव्या लागल्या. परिणामी, पुणे, सातारा, सोलापूर भागात शेतकरी बांधवांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय :
महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे –
१) ऐतिहासिक वारसा : छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले शिवजयंती व गणेशोत्सव इत्यादी बाबींमुळे राष्ट्रवादास उत्तेजन मिळाले.
२) ब्रिटिशांनी केलेले आर्थिक शोषण.
३) पाश्चात्य संस्कृती व पाश्चात्य भाषेचा प्रभाव ब्रिटिशांनी भारतात इंग्रजी शिक्षण सुरू केल्यामुळे भारतातील विविध प्रांतातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले.
४) दळणवळणातील क्रांती : रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे इत्यादी सुविधांमुळे देशातील विविध प्रांतातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले.
५) मध्यमवर्गाचा उदय : इंग्रजी शिक्षणामुळे डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक यासारखा सुशिक्षित मध्यमवर्ग पुढे येऊन त्यांनी राष्ट्रवादाच्या भावनेस व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.
६) प्रसारमाध्यमांमुळे लोकजागृती: प्रबोधन काळात विविध वृत्तपत्रे व साहित्य यामुळे लोकांमध्ये जागृती होऊन राष्ट्रवादी भावना वाढीस लागली.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना :
राष्ट्रवादाच्या अमूर्त भावनेला प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना पुढीलप्रमाणे :
मुंबई इलाख्यातील राष्ट्रवादी संस्था :
१) बॉम्बे असोसिएशन :
- स्थापना : २६ ऑगस्ट १८५३ •
- संस्थापक : नौरोजी फरदूनजी, जगन्नाथ शंकरसेठ
- नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मुंबईतील मोठ्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन केली.
- हेतू : सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे.
- बॉम्बे असोसिएशन ही मुंबई प्रांतातील (महाराष्ट्रातील) पहिली राजकीय संघटना आहे.
2) ईस्ट इंडिया असोसिएशन, १८६९ :
- दादाभाई नौरोजी यांनी १८६६ मध्ये लंडन येथे ‘ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती.
- १८६९ मध्ये या संघटनेची शाखा मुंबई येथे स्थापन.
३) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, १८८५ :
- संस्थापक : फिरोजशहा मेहता, बदुद्दीन तय्यबजी, न्या. के. टी. तेलंग (हे त्रिकूट ‘ब्रदर्स-इन-लॉ म्हणून प्रसिद्ध)
- इंग्लंडमधील जनमत भारतीयांबाबत जागृत करण्याचा प्रयत्न या संस्थेने केला.
- वरील सर्व संघटना या प्रादेशिक स्तरावर स्थापन झाल्या होत्या.
४) राष्ट्रीय सभा (राष्ट्रीय काँग्रेस) :
- २८ डिसेंबर १८८५ रोजी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली.
- राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन: २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात ७२ सदस्यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले.
- राष्ट्रीय सभा तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच आजचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होय.
द्विभाषिक राज्याची निर्मिती :
- ७ ऑगस्ट १९५६ रोजी संसदेने महाद्विभाषिक राज्याचा कायदा संमत केला.
- यानुसार मराठी व गुजराती भाषिकांचे द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात.
- या महाद्विभाषिक राज्यात महाराष्ट्रातील मुंबईसह १० जिल्हे, विदर्भातील ८ जिल्हे, मराठवाड्याचे ५ जिल्हे व गुजरात, सौराष्ट्रचे १६ जिल्हे समाविष्ट.
- द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना: १ नोव्हेंबर १९५६
- द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
- यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारताना ‘बंदुकीची गोळी न वापरता राज्य करण्याची’ ग्वाही दिली व ती तंतोतंत पाळली. मराठी जनतेस द्वैभाषिक राज्याची संकल्पना रूचली नाही व आंदोलने चालूच राहिली.
1957 च्या निवडणुका :
- १९५७ च्या निवडणुका : १९५७ साली लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिका निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसला ३९५ पैकी २२२ जागा मिळून तो पक्ष सत्तेवर आला. तर संयुक्त महाराष्ट्र समितीला १२४ जागा असे मोठे यश मिळाले. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा जिंकता आल्या नाहीत.
- मुंबई महापालिकेत समितीस ७१ जागा मिळाल्या व एम. व्ही. दोंदे महापौर झाले.
- मुंबईसह कोल्हापूर, कागल, कुरुंदवाड, इचलकरंजी येथेही समितीस यश मिळाले.
- ३० नोव्हेंबर १९५७ रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार होते. या दिवशी पसरणी घाट व पोलादपुरजवळ भाई माधवराव बागल
- यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीने प्रचंड मोर्चा काढला.
- यामध्ये एस.एम. जोशी, ना. ग. गोरे, प्र. के. अत्रे, जयंतराव टिळक, उद्धवराव पाटील यांचा समावेश होता.
- १ नोव्हेंबर १९५८ रोजी भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर मोर्चा काढण्यात आला.
- १९ डिसेंबर १९५८ रोजी संसदेवर दुसरा मोठा मोर्चा काढण्यात आला.
- जानेवारी १९५९ पासून सीमा लढा समितीतर्फे ‘करबंदी’ आंदोलन सुरू करण्यात आले.
मुंबई पुनर्रचना कायदा :
- मुंबई पुनर्रचना कायदा: एप्रिल १९६० मध्ये भारतीय संसदेने ‘मुंबई पुनर्रचना कायदा’ संमत केला. त्यानुसार, १ मे १९६० पासून द्वैभाषिक मुंबई राज्याचे महाराष्ट्र व गुजरात अशा दोन स्वतंत्र राज्यांत विभाजन करण्याचे घोषित केले.
नव्या महाराष्ट्राची रचना :
- १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना.
- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
- १९६० साली स्थापनेवेळी महाराष्ट्रात ४ प्रशासकीय विभाग व २६ जिल्ह्यांचा समावेश होता. २३५ तालुके,२८९ शहरे व ३५७७ खेडी होती.
- १ मे १९६० रोजी पंडित जवाहरलाल नेहरू व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन करण्यात आले.
- १९६६ : महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी ‘न्या. मेहेरचंद महाजन आयोगाची नेमणूक.
- महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत कारवार, बेळगाव, निपाणीसह एकूण १६ गावे प्रांतरचनेदरम्यान वादाचा मुद्दा ठरली होती.
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचा हीरकमहोत्सव साधेपणाने संपन्न झाला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन :
- १८७० मध्ये निजामाचे पंतप्रधान सालारजंग पहिले यांनी मराठी भाषिकांचा औरंगाबाद सुभा निर्माण करून त्यास ‘मराठवाडा’ असे नाव दिले.
- प्राचीन कालखंडात मराठवाड्यावर सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव, निजाम इत्यादी सत्तांनी राज्य केले.
- सातवाहन घराण्याने मराठवाडा परिसरात सुमारे ४५० वर्षे राज्य केले.
- ‘पैठण’ ही सातवाहनांची राजधानी होती.
- यादवांनी मराठवाडा परिसरात सुमारे २०० वर्षे राज्य केले.
- राष्ट्रकुटांच्या काळात वेरूळ (एलापूर) हे प्रारंभीचे राजधानीचे केंद्र होते.
- निजाम राजवटीत मराठवाडा हा हैदराबाद राज्याचा घटक होता
- मराठवाडा मुक्तिसंग्रामातील आंदोलने :
- स्वामी रामानंदतीर्थ : हे हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे जहाल नेते होते.
- २९ जून १९३८ रोजी स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद येथे ‘हैद्राबाद स्टेट काँग्रेस’ची स्थापना केली.
- ७ सप्टेंबर १९३८ रोजी निजामाने स्टेट काँग्रेसवर बंदी घातली.
- गांधीजींच्या आदेशावरून स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह स्थगित करण्यात आला.
- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व सेनापती बापट यांनी पुण्यात ‘हिंदू प्रतिकार मंडळ’ व ‘भागानगर निःशस्त्र प्रतिकार
- मंडळ’ या मंडळांची स्थापना केली.
- मराठवाडा मुक्तिसंग्रामात आर्य समाजाचे योगदान :
- ऑक्टोबर १९३८ पासून सुमारे दहा महिने आर्य समाजाने सत्याग्रह केला.
- १९४१ मध्ये हैद्राबाद संस्थानात आर्य समाजाच्या २४१ शाखा कार्यरत होत्या.
- हैद्राबाद संस्थानातील सक्तीच्या धर्मांतरास विरोध करून आर्य समाजाने धर्म शुद्धीकरणाची मोहीम उघडली.
- आर्य समाजाचे गुंजोटी येथील कार्यकर्ते ‘वेदप्रकाश’ हे हैद्राबाद संस्थानातील मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा होत.
- निझाम राजवटीत ‘पश्त आक्वाम’ या संघटनेतील दलित नेते निजाम राजवटीचे समर्थन करत असत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हैद्राबादचा निझाम हा भारताचा शत्रू असून त्याची बाजू घेऊ नका’ असे आवाहन हैद्राबाद संस्थानातील दलित बांधवांना केले.
- वंदेमातरम विद्यार्थी चळवळ :
- मराठवाडा मुक्तिसंग्रामात १९३८ साली हैदराबाद संस्थानातील विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम् चळवळ’ सुरू केली.
- औरंगाबाद शहरात ३०० विद्यार्थ्यांनी या चळवळीत भाग घेतला.
- १९३८ ते १९४८ या मुक्तिसंग्रामाच्या काळात वंदे मातरम् चळवळीने मोठी जागृती केली.
- १९३९ मध्ये त्रिपुरी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम् चळवळीस पाठिंबा देण्यात आला.

Police