Samajsdharak Mahatma Jyotiba & Savitribai fule / महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारकांची परीक्षात्मक माहिती व सराव टेस्ट

महात्मा फुले :

एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली. या मुक्ती संग्रामाचे मूळ स्त्रोत ज्योतिरावांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महात्मा फुलेंचा गौरव करताना म्हणतात, हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले.

  • जन्म : ११ एप्रिल १८२७, पुणे.
  • मूळ गाव : कटगुण (जि. सातारा)
  • मुळ आडनाव : गोऱ्हे
  • जोतिबा क्षत्रिय माळी समाजातील होते.
  • जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोऱ्हे आडनाव मागे पडून ते फुले बनले.
  • जोतिबांचे आजोबा : शेटिबा ; पिता : गोविंदराव, माता : चिमणाबाई (जोतिबा १ वर्षाचे असताना मातोश्रींचे निधन)
  • १८३४ ते १८३८ : पंतोजींच्या शाळेत जोतिबांचे प्राथमिक शिक्षण.
  • १८४० : वयाच्या १३ व्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी विवाह.
  • १८४१ ते १८४७ : उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत जोतिबांचे इंग्रजी शिक्षण.
  • १८४८ : पुण्यात ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत अपमान झाल्याने जोतिबा सामाजिक सुधारणांकडे वळले.

महात्मा फुले यांचे महिला उद्धाराचे कार्य :

अ) स्त्री शिक्षण : जोतिबांनी समाजकार्यास सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले.

  • १८४८ : पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू
  • ३ जुलै १८५१ : बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू.
  • १७ सप्टेंबर १८५१ : रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू
  • १५ मार्च १८५२ : वेताळ पेठेत मुलींची शाळा सुरू.
  • मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या जोतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती.
  • स्त्रीशिक्षणाविषयी महत्त्व सांगताना ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ असे फुले म्हणत.
  • १६ नोव्हेंबर १८५२ : जोतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.

ब) विधवा पुनर्विवाह :

  • १८६४: पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
  • १८६५ : विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव ढमढेरे येथे नाभिक बांधवांचा संप घडवून आणला.

क) बाल हत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना, १८६३ :

  • चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी जोतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.
  • जोतिबांना अपत्य नव्हते. काशिबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले.

महात्मा फुले यांचे अस्पृश्यतानिर्मूलन कार्य :

  • १९ व्या शतकात भारतात अस्पृश्यता निर्मुलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम केली
  • महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी संपूर्ण समाज व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे हा विचार सर्वप्रथम मांडला.
  • १८५१ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू होणे आवश्यक आ
  • १८५२ अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली.
  • १८५३ : पुण्यात ‘महार, मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकविणारी मंडळी’ ही संस्था स्थापन केली.
  • १८५८ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू.
  • महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राइझ फंडातून आर्थिक सहाय्य मिळाले.
  • १८६८ : स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
  • १८७३ : महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
  • १८७७ : मध्ये ‘दीनबंधू’ या वृत्तपत्रातून सामाजिक रुढी-परंपरा तसेच अस्पृश्यांच्या परिवर्तनाचे विचार मांडले.

सत्यशोधक समाजाची स्थापना : २४ सप्टेंबर १८७३.

  • शुद्रातिशुद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने महात्मा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
  • ‘सार्वजनिक सत्यधर्म’ व ‘गुलामगिरी’ या ग्रंथांत जोतिबांनी सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांबद्दल विवेचन केले आहे.
  • सत्यशोधक समाजाचे ब्रीद : वाक्य सर्वसाक्षी जगत्पती। त्यासी नकोच मध्यस्थी ।।
  • सत्यशोधक समाज ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे.
  • डिसेंबर १८७३ : मध्ये सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला.
  • सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष :नारायण मेघाजी लोखंडे
  • सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक : नारायणराव कडलक
  • सत्यशोधक समाजाची अधिवेशनेः १८७३ साली स्थापना झाली तरी सत्यशोधक समाजाची अधिवेशने १९११ पासून सुरू झाली.
  • पहिले अधिवेशन : १७ एप्रिल १९११, पुणे. • अध्यक्ष : स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू.
  • स्वागताध्यक्ष : गणपतराव बिरमल.

महात्मा फुलेंचे शेतकऱ्यांसाठी कार्य :

  • शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याविषयी जोतिबांनी सरकारला पुढील सूचना केल्या होत्या.
    • १) तलाव, बंधारे, धरणे बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा.
    • २) पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत.
    • ३) कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे.
    • ४) पशुपालनासाठी चालना द्यावी.
    • ५) सुधारित शेतीसाठी सुधारित अवजारे, अल्पव्याजी कर्जे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी.
  • १८७७ च्या दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळ पीडीत विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली.
  • १८८८ मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले असता जोतिरावांनी पारंपरिक शेतकऱ्याच्या वेषात त्यांची पुणे येथे भेट घेऊन भारतीय शेतकऱ्यांच्या हालाखीचे दर्शन घडविले.
  • जुन्नर (पुणे) येथील शेतकऱ्यांचा सावकारशाहीविरुद्धचा लढा जोतिबांनी यशस्वी केला.
  • १८७६-७७ च्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत जोतिबांच्या सहकायनि शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड यशस्वी केले.
  • शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते ते खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.
    • विद्येविना मती गेली। मतीविना नीति गेली।
    • नीतिविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
    • वित्ताविना शुद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जोतिबा हे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक होते.

महात्मा फुलेंचे शिक्षणविषयक विचार :

  • १८८२ साली भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते.
  • जोतिबा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना पुढील विचार मांडले-
    • १) सरकार शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करते, त्यातील उत्पन्न कनिष्ठांच्या (शेतकरी वर्गाच्या) शिक्षणावर खर्च केले पाहिजे,
    • २) १२ वर्षांखालील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे.
    • ३) प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत.

महात्मा फुलेंचे धर्मविषयक विचार :

जोतिबा कट्टर एकेश्वरवादी होते व ईश्वराचे अस्तित्व मानणारे होते.

  • जोतिबांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले आहे.
  • समतेवर आधारलेल्या मानवधर्माचा जोतिबांनी पुरस्कार केला.
  • अस्पृश्यांची कैफियत, खतफोडीचे बंड, सत्यशोधक समाज हे ग्रंथदेखील जोतिबांनी लिहिले.
  • अभंगांच्या धर्तीवर त्यांनी ‘अखंड’ रचले. (अखंडादी काव्यरचना)
  • जोतिबांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा शेवटचा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ मानला जातो.
  • पक्षाघातामुळे अंग लुळे पडल्याने जोतिबांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ काही काळ डाव्या हाताने लिहिला.
  • ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार या ग्रंथांमधून जोतिबांनी बहुजन समाजावर लादली गेलेली मानसिक गुलामगिरी निदर्शनास आणली.

महात्मा फुलेंचे राजकीय विचार :

  • इंग्रजांच्या सामाजिक, शैक्षणिक सुधारणाधोरणामुळे जोतिबांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती; मात्र शासन सत्ता समाजाच्या उन्नतीच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या हितसंबंधांच्या आड येईल असे वाटले त्या त्या वेळी त्यांनी सरकारवर टीकादेखील केली.
  • १८८९ च्या राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथील अधिवेशनात जोतिबांनी ‘जोपर्यंत शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेतसामावून घेतले जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय म्हणवून घेण्याचा अधिकार सभेस पोहोचत नाही’ असे परखड विचार मांडले.
  • आठ वर्षांच्या आतील मुलांना कामावर घेण्यात येऊ नये असे निवेदन जोतिबांनी सरकारला सादर केले.
  • महात्मा फुले यांच्यावर प्रभाव : जोतिबांवर थॉमस पेन यांच्या ‘राईटस ऑफ मॅन’ व ‘कॉमन सेन्स’ या ग्रंथांचा विशेष प्रभाव होता. शालेय जीवनात जोतिबांवर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचा प्रभाव पडला.
  • जोतिबांचे सहकारी : सदाशिव बल्लाळ गावंडे, सखाराम परांजपे, लोखंडे, केशवराव भवाळकर, वाळवेकर इत्यादी.
  • नगरसेवक : १८७६ ते १८८२ या काळात फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते.
  • नगरसेवक असताना फुलेंनी पुणे मार्केटची इमारत बांधण्यास व लॉर्ड रिपनला मानपत्र देण्यास विरोध दर्शविला व त्यावरील खर्च शिक्षणासाठी वापरावा, अशी शिफारस केली.
  • समाजातील व्यसनाधिनता दूर करण्यासाठी फुल्यांनी पुण्यातील दारूच्या गुत्त्यांना परवाना देण्यास विरोध केला.
  • १८७५ : : न्या. रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची हत्तीवरून मिरवणूक काढली, त्यावेळी जोतिबांनी न्या. रानडे यांना सहकार्य केले.
  • शिवजयंती सुरुवात : १८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला.
  • रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज जोतिबांनी केला होता.
  • १८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली ‘शिवजयंती’ साजरी केली.
  • त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी १८९५ पासून शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले.
  • १८७७ : दीनबंधू हे वृत्तपत्र जोतिबांच्या आशिर्वादाने चालू झाले. संपादक: कृष्णराव भालेकर.
  • जोतिबांना जीवे मारण्यासाठी पाठविण्यात आलेले रोडे व कुंभार हे रामोशी बांधव जोतिबांना शरण आले.
  • जोतिबांच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सावलीप्रमाणे साथ दिली.
  • टिळक व आगरकर यांची डोंगरी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुलेंनी या दोघांचा मुंबई येथे सत्कार केला.
  • पंडिता रमाबाई यांना धर्मांतरापासून रोखण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला.
  • जोतिबांबद्दलचे गौरवोद्गार : ‘समाजक्रांतिकारक’
  • ‘खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार’
  • ११ मे १८८८ : मुंबईच्या जनतेच्या वतीने रावबहाद्दर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी जोतिबांना महात्मा ही पदवी दिली.
  • डॉ. धनंजय किर फुलेंविषयी म्हणतात, “जोतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी तणे, बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली.”
  • महात्मा गांधी फुलेंविषयी म्हणतात, ‘जोतिबा हे खरे महात्मा होते.’
  • ग्रामची या तत्त्ववेत्याने जोतिबांना ‘सेंद्रीय बुद्धीवंत’ असे संबोधले.
  • बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदूस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन असे संबोधले आहे.
  • डॉ. धनंजय किर यांनी जोतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे संबोधले आहे.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘हू वेअर द शुद्राज?’ (शुद्र कोण होते?) हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
  • जोतिबा फुलेंचे निधन : २८ नोव्हेंबर १८९०. जोतिबांनी मृत्यूपत्रात आपले दहन न करता परसदारी मिठात घालून पुरण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.
  • जोतिबा हे उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता साधणारे सुधारक होते.
  • स्त्री-पुरुष समानता, जातीभेदास विरोध, स्वातंत्र्य, समता व बंधूता यांचे महत्त्व पटवून मानवाचे स्वत्व जागविणारे जोतिबा हे भारतीय समाजक्रांतीचे जनक होते.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारक सराव टेस्ट
Samajsdharak Mahatma Jyotiba & Savitribai fule / महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारकांची परीक्षात्मक माहिती व सराव टेस्ट
सावित्रीबाई फुले :
  • जन्म : 3 जानेवारी 1831, नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे.
  • महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले त्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच पहिल्या मुख्याध्यापिका होत. ‘
  • काव्यफुले’, ‘बावन्नकशी’, ‘सुबोध रत्नाकर’ या काव्यसंग्रहातून सावित्रीबाईंनी समाज प्रबोधनाचे विचार मांडले.
  • महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे सांभाळली, विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी संस्था स्थापन केली. हळदी-कुंकू, चहापान असे कार्यक्रम घेऊन स्त्रियांना एकत्रित केले.
  • निधन : १० मार्च १८९७ रोजी प्लेगच्या रुग्णांची सुश्रुषा करताना प्लेगची बाधा होऊन या क्रांतिज्योतीचे निधन.
  • सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या स्त्री-शुद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविला.
  • महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचा गौरव केला जातो.
  • ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात ‘स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Samajsdharak Mahatma Jyotiba & Savitribai fule / महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारकांची परीक्षात्मक माहिती व सराव टेस्ट

4 thoughts on “Samajsdharak Mahatma Jyotiba & Savitribai fule / महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारकांची परीक्षात्मक माहिती व सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र