महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ट्ये : General information about the geography of Maharashtra
General information about the geography of Maharashtra
- महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे.
- राज्यातील कळसूबाई हे सर्वोच्च शिखर (उंची १६४६ मी.) सह्याद्री रांगांत आहे.
- दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते; तिला रेगुर म्हणतात.
- आंबोली (जि. सिंधुदुर्ग, कोकण) येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस.
- बुलढाणा जिल्ह्यातील ‘लोणार‘ हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर.
- नागपूरची – संत्री, जळगावची – केळी, नाशिक–सांगलीची – द्राक्षे, रत्नागिरीचा – हापूस आंबा प्रसिद्ध आहे.
- मुंबई : महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी.
- नागपूर : राज्याची उपराजधानी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार या नागभूमीतच केला.
- कोयना वीजकेंद्र, जायकवाडी धरण, तारापूरचे अणुवीज केंद्र, अरबी समुद्रातील ‘बॉम्बे हाय’ तेलक्षेत्र व इतर अनेक उद्योगधंद्यांनी राज्याच्या वैभवात भर टाकली आहे.
- ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारे मुरूड-जंजिरा, सिंधुदुर्ग, समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मघर असलेला शिवनेरी, राजमाता जिजाऊंचे माहेरघर असलेला सिंदखेड राजा; रायगड आदी प्रेक्षणीय किल्ले.
- शेती हा राज्यातील प्रमुख व्यवसाय.
- महाराष्ट्राचा आकार काटकोन त्रिकोणी असून पंश्चिमेकडील ७२० किमीची कोकण किनारपट्टी हा या त्रिकोणाचा पाया, तर राज्याचे पूर्व टोक हा या त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे.
- ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमी याने गुजरात व उत्तर कोकण या प्रदेशास ‘लारिका’, तर दक्षिण कोकणास ‘आरिका‘ असे संबोधले आहे.
- ४ ऑक्टोबर २०२४ : अहमदनगरचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास केंद्र सरकारची मंजुरी
महाराष्ट्राचा भूगोल : General information about the geography of Maharashtra
महाराष्ट्राची निर्मिती : १ मे १९६० (१ मे हा ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो)
* कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १ मे २०२० रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा हीरकमहोत्सव साधेपणाने संपन्न झाला.
क्षेत्रफळ : ३,०७,७१३ चौकिमी (३०.७७१३ द.ल. हेक्टर; किंवा १,१८,८०९ चौ. मैल)
अक्षवृत्तीय विस्तार : १५° ८’ उत्तर ते २२° १’ उत्तर अक्षांश (१५°३५′४०” ते २२°२’१३” उत्तर अक्षांश)
रेखावृत्तीय विस्तार : ७२° ६’ पूर्व ते ८०° ९’ पूर्व रेखांश (७२°३८’४५” ते ८०°५३’१७” पूर्व रेखांश)
- मराठी विश्वकोशानुसार महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार : १५° ४८’ उत्तर ते २२° ६’ उत्तर अक्षांश
- मराठी विश्वकोशानुसार महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार : ७२° ३६’ पूर्व ते ८०° ५४’ पूर्व रेखांश
- पूर्व-पश्चिम लांबी : सुमारे ८०० कि.मी. (४९७ मैल)
- दक्षिणोत्तर रुंदी : सुमारे ७२० कि.मी.
- समुद्रकिनाऱ्याची लांबी : ७२० कि.मी. (४४७ मैल)
- स्थान: भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून.
- शेजारची राज्ये : महाराष्ट्रच्या वायव्येस : गुजरात राज्य, ‘दादरा नगरहवेली आणि दमण-दीव’ हा केंद्रशासित प्रदेश
- उत्तरेस : मध्य प्रदेश पूर्वेस व ईशान्येस : छत्तीसगढ
- आग्नेयेस : तेलंगणा राज्य दक्षिणेस : कर्नाटक नैऋत्येस: गोवा
- लोकसंख्या : (२००१) : ९,६८,७८,६२७
- २०११ चा अंतिम निष्कर्ष : ११,२३,७४,३३३
- भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण: ९.४२% (२००१) * ९.२८% (२०११)
- राजधानी : मुंबई,
- उपराजधानी : नागपूर
- विधानसभा मतदारसंघ : २८८
- विधानपरिषद मतदारसंघ : ७८
- राज्यातील लोकसभा मतदारसंघ : ४८
- राज्यातील राज्यसभा मतदारसंघ : १९
- राज्यातील जिल्हे : ३६ (पालघर हा ३६ वा जिल्हा. क्षेत्रफळाने अहमदनगर सर्वात मोठा, तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा)
- जिल्हा परिषदा : ३४ (पालघर ३४ वी जिल्हा परिषद. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत.)
- तालुके : ३५८ (३५५+३)
- ग्रामपंचायती : २७,९१३
- पंचायत समित्या : ३५१
- महानगरपालिका : २९
- नगरपरिषदा : २४५
- नगरपंचायती : १४६
- कटक मंडळे : ७
- शहरे : ५३४
- वस्ती असलेली गावे : ४०,९५९
- वस्ती नसलेली गावे : २,७०६
महाराष्ट्रातील ६ प्रशासकीय विभाग व त्यांमधील ३६ जिल्हे : General information about the geography of Maharashtra
प्रशा. विभाग | समाविष्ट जिल्हे | जिल्हे |
छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली | ८ |
नाशिक | नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव | ५ |
पुणे | पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर | ५ |
नागपूर | नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर | ६ |
अमरावती | अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ | ५ |
कोकण | पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग | ७ |
एकूण | ३६ |
प्रादेशिक विभाग | समाविष्ट प्रशासकीय विभाग व जिल्हे | जिल्हे |
विदर्भ (वऱ्हाड) | अमरावती विभाग : सर्व ५ जिल्हे, नागपूर विभाग : सर्व ६ जिल्हे | ११ |
पश्चिम महाराष्ट्र | पुणे विभाग : सर्व ५ जिल्हे नाशिक विभाग : नाशिक व अहमदनगर (२) | ७ |
मराठवाडा (गोदावरी खोरे) | छ. संभाजीनगर विभाग सर्व ८ जिल्हे | ८ |
कोकण विभाग | कोकण विभाग : सर्व ७ जिल्हे | ७ |
खानदेश (तापी खोरे) | नाशिक विभाग : धुळे, नंदूरबार, जळगाव (३) | ३ |
एकूण | ३६ |
राज्यातील प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम : General information about the geography of Maharashtra
१) छत्रपती संभाजीनगर (६४,८१३ चौ. किमी), २) नाशिक, ३) पुणे, ४) नागपूर, ५) अमरावती,
६) कोकण (३०,७४६ चौ. किमी सर्वात कमी)
महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन : General information about the geography of Maharashtra
- १९८० पर्यंत राज्यात २६ जिल्हे अस्तित्वात होते.
- १९८१ नंतर काही जिल्ह्यांचे विभाजन झाले असून आजअखेर राज्यात जिल्ह्यांची संख्या ३६ इतकी झाली आहे.
विभाजनाचा दिवस | जुना जिल्हा | नवीन जिल्हा |
१ मे १९८१ | रत्नागिरी | सिंधुदुर्ग |
औरंगाबाद (छ. संभाजीनगर) | जालना | |
१५ ऑगस्ट १९८२ | उस्मानाबाद (धाराशिव) | लातूर |
२६ ऑगस्ट १९८२ | चंद्रपूर | गडचिरोली |
१ ऑक्टोबर १९९० | बृहन्मुंबई | मुंबई शहर व मुंबई उपनगर |
१ जुलै १९९८ | अकोला | वाशिम |
धुळे | नंदूरबार | |
१ मे १९९९ | परभणी | हिंगोली |
भंडारा | गोंदिया | |
१ ऑगस्ट २०१४ | ठाणे | पालघर |
- सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा.
- गडचिरोली हा अतिपूर्वेकडील जिल्हा.
- नंदूरबार हा राज्यातील अतिउत्तरेकडील व शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा.
- कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ७ जिल्ह्यांना मिळून ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
- किनाऱ्यांची लांबी (किमी) : रत्नागिरी : २३७ रायगड : १२२
- मुंबई व मुंबई उपनगर : ११४ पालघर : १०२ ठाणे : २५ किमी.
राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम : General information about the geography of Maharashtra
१) अहमदनगर (१७,०४८ चौकिमी, सर्वाधिक), २) पुणे (१५,६४३ चौकिमी), ३) नाशिक (१५,५८२ चौकिमी),
४) सोलापूर (१४,८९५ चौकिमी), ५) गडचिरोली (१४,४१२ चौकिमी).
राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम : General information about the geography of Maharashtra
१) मुंबई शहर (१५७ चौकिमी, सर्वात कमी), २) मुंबई उपनगर (४४६ चौकिमी), ३) भंडारा (३,८९६ चौकिमी),
४) ठाणे (४, २१४ चौकिमी), ५) हिंगोली (४,५२६ चौकिमी).

Very nice 👍